अनीश आणि अश्विनीचा आदरांजली वाहण्यासाठी मेणबत्ती मोर्चा

अनीश आणि अश्विनीचा आदरांजली वाहण्यासाठी मेणबत्ती मोर्चा
 सहा महिन्यांपूर्वी, पोर्शे प्रकरणाने सर्वांना हादरवून सोडले. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन निष्पाप जीव गमावले आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही न्याय मागत आहेत. आज रविवारी, 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता,  त्यांच्या स्मृतीला आदरांजली देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे राहण्यासाठी मूक मेणबत्ती मोर्चासाठी घटनास्थळी एकत्र येत पुणेकर एकवटले. हा अपघात कधीही विसरला जाणार नाही आणि पिडीतांचा आवाज ऐकला जाईल याची खात्री करण्यासाठी एकत्र येत आदरांजली वाहिली.
सहा महिन्यांपूर्वी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असलेल्या पोर्श कारच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन आयटी व्यावसायिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी आयोजित केलेल्या कँडल मार्चमध्ये पुणेकरांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

Economic Development today is largely dependent upon the legal landscape of the country: Akshat Khetan