गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते
गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते - उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी चिंचवड, २६ - संस्कार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरू ज्यावेळी शिष्यांशी नाते जोडतो त्यावेळी वेगळी निर्मिती होत असते. गुरू शिष्याची साथ कधीही सोडत नाही. असा उपदेश अर्हम विज्जा प्रणेता, उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी यांनी केला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड यांच्यातर्फे शनिवार २३ ते शुक्रवार, २९ मार्च दरम्यान सुखी धर्म सभामंडप, चिंचवड स्टेशन येथे 'पवित्र होळी पंच दिवसीय चातुर्मास 'चे आयोजन करण्यात आले असून, त्यात सकाळच्या प्रवचन सत्रात राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी यांचे शिष्य अर्हम विज्जा प्रणेता, उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी बोलत होते. या प्रवचनासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरासह पूर्ण राज्यभरातून भाविक दर्शन व प्रवचनासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. २८ मार्च रोजी राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या ३२ व्या आनंद स्मृती दिनानिमित्त गुरुमंत्र दीक्षा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या विशेष पार्श्वभूमीवर श्री प्रवीणऋषीजी यांनी आप
Comments
Post a Comment